Friday, October 21, 2022
समाजशास्त्र विभागाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन संपन्न
*कन्या महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे भित्तीपत्रिकेचे अनावरण*
मिरज : कन्या महाविद्यालय मिरज , समाजशास्त्र विभागातर्फे भित्तीपत्रिकेचे अनावरण महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.उल्हास माळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. सदरील भित्तीपत्रिका ही समाजशास्त्राचा परिचय या विषयावर समाजशास्त्राच्या विध्यार्थिनींनी तयार केली. एकोणीसाव्या शतकात एक स्वतंत्र शास्त्र म्हणून समाजशास्त्र उदयास आलेले आहे. तेव्हापासून वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानवी समाजिक घटनांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जाऊ लागला. समाजशास्त्रात प्रामुख्याने सामाजिक घटनांचा, सामाजिक संबंधांचा, सामाजिक अंतर्क्रियेचा, सामाजिक संस्थांचा , मानवी समूहांचा, शहरी , ग्रामीण आणि आदिम समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो. त्याचबरोबर समाजशास्त्रात अनेक संशोधने झाली आहेत त्या संशोधनावर आधारित सिद्धांत निर्मिती होत आहे आणि हे सिद्धांत त्रिकालबाधित सत्य असलेले आपल्याला दिसून येतात. सिद्धांत निर्मितीमध्ये अनेक समाजशास्त्रज्ञांनी मोलाचे योगदान दिले आहे . त्यात ऑगस्ट कॉमते, कार्ल मार्क्स, एमील दुर्खीम, मॅक्स वेबर, हर्बर्ट स्पेन्सर , जॉर्ज सिमेल, डॉ.जी.एस.घुर्यें, एन. एन. श्रीनिवास , टी. एन. मुजुमदार, ए.आर.देसाई, डी. पी.मुखर्जी इत्यादींनी केलेल्या संशोधनाचा आढावा सदरील भित्तीपत्रिकेमध्ये घेण्यात आला.कार्यक्रमाप्रसंगी श्रुती घोगरे या विध्यार्थिनीने भित्तीपत्रिकेची भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला . कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.गंगाधर चव्हाण यांनी केले , ह्या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू, भगिनी आणि विध्यार्थिनी उपस्थित होत्या.
Tuesday, October 18, 2022
समाजाच्या अध्ययनात समाजशास्त्राची भूमिका महत्वाची . प्रा.डॉ. रुपाली सांभारे यांचे प्रतिपादन
*समाजाच्या अध्ययनासाठी समाजशास्त्र अत्यंत मोलाची भूमिका बजावते.* डॉ. प्रा. रुपाली सांभारे यांचे प्रतिपादन
मिरज : कन्या महाविद्यालय मिरज , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि समाजशास्त्र विभाग आयोजित "समाजशास्त्राची उपयोगिता" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. त्या प्रसंगी व्याख्यात्या म्हणून दत्ताजीराव कदम आर्टस् कॉमर्स सायन्स कॉलेज, इचलकरंजी येथील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका प्रा.डॉ.रुपाली सांभारे ह्या बोलत होत्या. बोलताना पुढे त्यांनी समाजिकशास्त्रांची समाजातील भूमिका, समाजशास्त्राचा अभ्यास विषय, समाजिक समस्यांचा अभ्यास करताना समाजशास्त्राचा होणारा उपयोग , समाजशास्त्राचा व्यावहारिक जीवनातील उपयोग, करियरच्या दृष्टीने होणारे फायदे तसेच एमील दुर्खीम यांचा आत्महत्तेचा सिद्धांत आजच्या सद्य परिस्थित कसा लागू पडतो हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. भारतीय समाजापुढील आव्हाने कमी करण्यासाठी समाजशास्त्र अनेक अंगाने उपयोगाचे आहे अशे प्रतिपादन व्याख्यानाद्वारे केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर हे उपस्थित होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख डॉ. माधुरी देशमुख , महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी आणि समाजशास्त्र विषयाच्या विध्यार्थिनी उपस्थित राहिल्या. कार्यक्रमाचे स्वागत प्रस्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.गंगाधर चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालनाची भूमिका प्रा. डॉ. शबाना हळगळी यांनी पार पडली. कार्यक्रमासाठी तांत्रिक सहकार्य प्रा.रमेश कट्टीमनी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.विनायक पवार यांनी मानले.
https://fb.watch/gcz-stXxZ6/
व्याख्यान: समाजशास्त्राची उपयोगिता
पूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी वरील लिंकला क्लिक करा.
आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
Subscribe to:
Posts (Atom)
कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची जलक्रांती फिशरीजला भेट
कन्या महाविद्यालयात मिरज येथील विद्यार्थिनींची जलक्रांती फिशरीज ला अभ्यास भेट कन्या महाविद्यालयात मिरज येथील समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभ...

-
‘व्यक्तिमत्त्व विकास’ या पुस्तकाचे मा. विनायकराव गोखले यांच्या हस्ते प्रकाशन मिरज: दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटी मिरज या संस्थेचे अध्यक्ष ...