Thursday, July 31, 2025

नास्तिक होणे सोपे नसते.



 नास्तिक बनणं सोपं नसतं..!

मी अमुक धर्माचा आहे असं जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा मानसिक दृष्ट्या त्याला त्या धर्माचा आधार वाटत असतो. शिवाय तो कुठल्यातरी समूहाची जोडून आहे अशी भावना मनात राहिलेली असते. त्यामुळे कोणीतरी आपल्याला मदत करणार आहे, आपल्या पाठीशी आहे म्हणजे त्या धर्माचे देव, अशी समजूत त्याला उपयोगी पडत असते. पण ही समजूत आंधळी तर असतेच पण तात्पुरती देखील असते.  

अमुक एका धर्माचा म्हटले की त्याला स्वतःबद्दल अभिमान वाटतो आणि तो धर्माचाही अभिमान बाळगू लागतो. पण हा अभिमान आंधळा असल्यामुळे तो त्याला कट्टर बनण्याकडे घेऊन जातो. मग त्या त्याच्या धर्माने त्याला कितीही फसवले, लुटले किंवा वापर करून घेतला तरीही त्याला कळत नाही. उलट हे धार्मिक कृत्य आहे असे म्हणून तो ते अखंड करत राहतो. 


जेव्हा या सर्व गोष्टी एखाद्याच्या लक्षात येतात तेव्हा तो बंड करतो आणि या धार्मिकतेचा त्याग करतो. तिथून नास्तिकतेची सुरुवात होते. धर्माला आणि देवाला नकार देऊन नास्तिकता जन्माला आली तरीही नकारातून आलेली नास्तिकता ही आयुष्यभर टिकवून ठेवणे फार कठीण असते. कारण एका नकारातून आपण बाहेर पडलो तरी पुढे जगायचे कसे हा प्रश्न समोर उभा राहतो. त्याचे कारण असे की, आधारासाठी ना देव असतो ना धर्म असतो. मानसिक आधार कसा उभा करायचा यासाठी त्याची लढाई सुरू होते. या लढाई साठी त्याला समाजाचे कोणतेही पाठबळ नसते. 


धार्मिक माणूस हा धर्माने दिलेले आदेश पाळतोच असे नाही. त्यामुळे त्याला धार्मिक वागणे म्हणजेच नीती व मूल्याने वागणे जमतेच असे नाही. पण नास्तिकता स्वीकारल्यावर पहिले लक्ष जाते ते आपल्या वागण्यावर. आणि आपले वागणे बरोबर की चूक याचा सतत विचार करायला सुरुवात होते. कारण देव नाही, धर्म नाही, मग आपण वागायचे कसे असा प्रश्न मनात निर्माण होतो. आणि या प्रश्नाचे उत्तर असे मिळते की विवेकाने वागल्याशिवाय पर्याय नाही. थोडक्यात धार्मिक बनण्याऐवजी विवेकी बनणे घडू लागते. आणि मग अशावेळी आपण कसे वागायला हवे याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो. 


जर नास्तिकाला कसे जगायचे याविषयीचं तंत्र सापडलं तर तो विवेकवादी व्हायला सुरुवात होते. हे तंत्र म्हणजे, लॉजिक वापरणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाणवणे. लॉजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन पद्धतींचा खूप मोठा आधार नास्तिकांना मिळतो. तेव्हा तो पूर्णपणे देव आणि धर्म यांना नाकारतो. कारण देव हा अस्तित्वात नाही याचे भान येते. देव नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोन आपले जगणे सुसह्य करतो हे लक्षात येते. धर्म नव्हे तर नीतीमूल्यं आणि विवेक आपलं जगणं शांततापूर्ण बनवतो हे अनुभवाला येते. धर्माशिवाय आपण चांगली व्यक्ती म्हणून जगू शकतो हे जमू लागते. एवढेच नव्हे तर कोणत्याही गटाचा, समुदायाचा, जातीचा, संबंध नसल्याने सर्व माणसे ही एकच आहेत असे लक्षात येऊ लागते. त्यामुळे सामाजिक जाणीवा प्रगल्भ होत जातात. 


लॉजिकचा आधार असल्याने जेव्हा केव्हा मानसिक संकटे येतील तेव्हा त्यांना सहजगत्या तोंड देता येते आणि या संकटांना ओलांडून नव्या नव्या गोष्टी हातून घडू लागतात. अशा समजुती निर्माण होतात की ज्यामुळे आयुष्याची बांधणी नीटनेटकी होऊ लागते. पूर्वीच्या समजुती धार्मिक व दैववादी मानसिकतेमुळे गोंधळलेल्या आणि विस्कटलेल्या असतात. पण इथे आपल्या स्वतःला ओळखायला आपण शिकतो. आणि जगण्यांमधील अनेक नवीन हेतू दृष्टीस पडू लागतात. 


धार्मिकांना असे सांगितले जाते की धर्माची शिकवण जर त्यांनी पार पाडली नाही तर ते नरकात जातील. या भीती दाखवण्याच्या तंत्रामुळे धार्मिक व्यक्ती सतत मानसिक दबावाखाली राहते आणि तिच्यामध्ये काळजी, चिंता, अज्ञात शक्तीची भीती घर करून राहते. शिवाय धार्मिक लोक विशिष्ट अशा धर्मगुरूंच्या देवांचे-नियमांचे गुलाम बनून राहतात. कारण धर्मगुरुला त्याच्या धर्माच्या समजूतीत सर्वांना टिकवून ठेवायचे असते. सातत्याने या धार्मिकांवर जेव्हा धर्माचे सर्व नियम पाळण्याची अघोषित सक्ती निर्माण होते तेव्हा त्यांच्यामध्ये अस्थिरता, अस्वस्थता आणि परावलंबित्व निर्माण होते. 


नास्तिकता जेव्हा स्वीकारायला सुरुवात होते तेव्हा अर्थातच खूप मोठा ताण मनात निर्माण होतो. वर्षानुवर्षे आणि लहानपणापासून आपण स्वीकारलेल्या समजुती सोडून देणे इतके सोपे नसते. सोडून देताना भीती देखील दाटून येत राहते. पुढे आपले आयुष्य नीट जाईल की नाही याविषयी साशंकता निर्माण होते. नवनवीन गोष्टींचा शोध लागल्यामुळे इतकी वर्ष आपण वाया घालवली याची खंत दाटून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचे आपल्या जवळचे नातेवाईक आणि मित्र यांच्यापासून वैचारिक फारकत घ्यावी लागते. कारण आपण आपल्या विषयीच्या, इतरांविषयीच्या आणि जगाविषयीच्या समजूती व संकल्पना बदलून टाकायला सुरुवात केलेली असते. 


देवाच्या विरोधात बोलायचं नाही आणि धर्माला प्रश्न विचारायचे नाही अशी कडेकोट समजूत धार्मिकात निर्माण झाल्यामुळे ते कधीही प्रश्न विचारण्याचे धाडस करत नाहीत. तीच सवय लागल्याने इतर व्यवहारात देखील ते प्रश्न विचारत नाहीत आणि एक प्रकारे भोळसटपणा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असतो. ज्याला श्रद्धाळूपणा म्हणतात. पण नास्तिकता स्वीकारल्यावर मात्र प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य येते. उलट-सुलट तपासणी करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि अचूक उत्तर निर्माण करण्यामध्ये हातखंडा तयार होतो. नास्तिकता स्वीकारल्याने निस्वार्थपणा, दयाबुद्धी आणि एकमेकांना मदत करणे या मूल्यांविषयी सजगता निर्माण होते. धार्मिक लोक स्वतःच्या धर्माचाच फक्त विचार केल्यामुळे स्वार्थी बनतात. इतर धर्मांविषयीची दयाबुद्धी कमी राहते किंवा नष्ट होते. आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना मदत करणे याविषयी शून्य भाव तयार होतो. यातून धार्मिक तेढ, जातीय तेढ सातत्याने समाजात वर्षानुवर्षे टिकून राहिलेली आहे. 


नास्तिक व्यक्तींनी मूल्यांना महत्त्व दिल्यामुळे ते कोणताही रंग, भगवा-हिरवा-निळा-पांढरा मूल्यांना चढवत नाहीत. कारण मूल्यं ही मूल्यं असतात. एवढेच नव्हे तर आपल्या वागण्यामध्ये काही दोष आहेत का इकडेही नजर वळू लागते. आणि आपल्या विचारातील दोष हुडकून काढायला सुरुवात होते. धार्मिक व्यक्ती सहसा स्वतःला जबाबदार अशावेळी धरत नाही, तर दैववादामुळे किंवा दुसऱ्यामुळे माझे नुकसान होते असे म्हणत राहते. नास्तिक मात्र आपल्या चुकांना आपण जबाबदार आहोत इथून सुरुवात करतो. त्यामुळे त्याच्या वागण्यातील दोष किंवा कॉग्निटीव्ह डिस्टॉरशन्स त्याच्या लक्षात येतात व नेमकेपणाने ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे इथे देवाचा धावा नसतो किंवा कुठल्यातरी महाराज-बुवाकडे जाऊन स्वतःला दुरुस्त करणे नसते. स्वतःला स्वतःच दुरुस्त करणे ही क्षमता निर्माण झालेली असते. 


नास्तिकांना वास्तव जगणे काय असते हे समजू लागते. कारण वास्तव नसलेल्या देवाचा त्याग केलेला असतो. धर्माच्या कहाण्या आणि उपदेश यांच्या अवास्तवपणाचे भान येऊ लागते. रियालिटी किंवा वास्तवात जगणे नास्तिकाला समजू लागते. आणि आजूबाजूचे वास्तव किती दाहक वा उपयोगी आहे याचा सारासार विचार जमू लागतो. धर्माचे सर्वात मोठे भांडवल म्हणजे सामाजिक आणि विश्वाची अस्थिरता असते. या अस्थिरतेमुळे माणूस मानसिकदृष्ट्या असहाय बनतो. त्यामुळे आधारासाठी तो देवधर्म करत राहतो. पण ही अनिश्चितता स्वीकारण्याचे धैर्य नास्तिक बनल्यामुळे येते. 


नास्तिक होत जाताना झगडा करावा लागतो तो आपल्या स्वतःची प्रतिमा कशी असायला हवी याविषयी विचार करणे याच्याशी... 

आपले नातेसंबंध निरामय कसे राहतील याच्याशी...

 आपल्या समजूती निरोगी कशा बनतील याच्याशी... आणि 

आपले मानसिक स्थैर्य कसे राखता येईल याच्याशी!! 


हा झगडा निरंतरपणे नास्तिक करत राहतो. तो अवघड असला तरी तो साध्य असतो. आणि जर आपण ते साध्य केले तर नास्तिकाचे रूपांतर विवेकवादी माणसांमध्ये होते. ज्याला..

रॅशनल थिंकर म्हणतात!!

- Dr.Pradeep Patil

Sunday, July 20, 2025

समाजशास्त्राचे शिक्षण हवे अनिवार्य. -डॉ.मुक्ता दाभोळकर

 

"समाजशास्त्राचे शिक्षण हवे अनिवार्य" या विधानाच्या संदर्भात खालीलप्रमाणे सविस्तर स्पष्टीकरण देता येईल:


🔷 1. समाजशास्त्र म्हणजे काय?

समाजशास्त्र हे मानवी समाज, त्यातील संस्था, मूल्यव्यवस्था, नाती, वर्तन, बदल व सामाजिक समस्या यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हे शास्त्र व्यक्तीला समाजातील विविध घटकांबाबत वैज्ञानिक, समतोल आणि सूक्ष्म दृष्टी देते.


🔷 2. समाजशास्त्राचे शिक्षण अनिवार्य का असावे?

a. सामाजिक समज आणि सहिष्णुता वाढते:

समाजशास्त्र शिकल्यामुळे व्यक्ती इतर जाती, धर्म, वर्ग, लिंग, भाषा, वंश यांच्याबद्दल सहिष्णु आणि समजूतदार बनते. त्यामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित होण्यास मदत होते.

b. सामाजिक प्रश्नांची जाण:

बालकामगार, स्त्रीभ्रूणहत्या, जातीभेद, गरिबी, भ्रष्टाचार, लाचखोरी, बेरोजगारी यांसारख्या सामाजिक समस्यांची मुळं आणि उपाय शोधण्याची क्षमता समाजशास्त्र शिकवते.

c. मूल्यशिक्षण आणि संवेदनशीलता:

समाजशास्त्रामुळे माणूस संवेदनशील बनतो. सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता यासारख्या मूल्यांबाबत सजगता निर्माण होते.

d. शाश्वत विकासासाठी विचारमूल्यं:

सामाजिक विकास, पर्यावरण रक्षण, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास यासारख्या बाबींमध्ये समाजशास्त्रीय दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त ठरतो.

e. नागरी जबाबदारीची जाणीव:

एक जबाबदार नागरिक म्हणून संविधान, कायदे, हक्क, कर्तव्य यांची जाणीव समाजशास्त्र शिकल्याने होते.


🔷 3. शालेय व महाविद्यालयीन पातळीवर अनिवार्यता का गरजेची?

  • लहान वयात सामाजिक दृष्टिकोन रुजतो.

  • राष्ट्रीय एकात्मतेसाठी सामाजिक समज वाढवणे गरजेचे आहे.

  • भविष्यातील मतदार, प्रशासक, शिक्षक, डॉक्टर, अभियंते हे सर्व समाजाचा भाग असल्याने त्यांना सामाजिक जाणीव असणे आवश्यक आहे.


🔷 4. उदाहरणे:

  • SC/ST अत्याचार प्रतिबंध कायद्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त.

  • समाजसुधारकांची प्रेरणा (जसे महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकर) त्यांच्या विचारांचे आकलन समाजशास्त्रामुळे शक्य होते.


🔷 निष्कर्ष:

समाजशास्त्र हे केवळ एक विषय नाही, तर एक समर्पक सामाजिक दृष्टीकोन आहे. त्यामुळे देशात प्रत्येक व्यक्तीला समाजशास्त्राचे मूलभूत शिक्षण देणे अनिवार्य करणे ही काळाची गरज आहे. हे शिक्षण सामाजिक सलोखा, विकास आणि समतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

Thursday, March 27, 2025

कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची जलक्रांती फिशरीजला भेट











कन्या महाविद्यालयात मिरज येथील विद्यार्थिनींची जलक्रांती फिशरीज ला अभ्यास भेट

 कन्या महाविद्यालयात मिरज येथील समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी जलक्रांती फिशरीज मिरजच्या मत्स्य उत्पादन व संवर्धन केंद्राला नुकतीच भेट दिली. या अभ्यास भेटीतून त्यांनी विविधगोष्टी समजून घेतल्या त्यात जलक्रांती मत्स्यालय हा एक महत्वाचा प्रकल्प आहे, जो महाराष्ट्र राज्यातील जलसंपदांचा शाश्वत वापर आणि मत्स्यपालनाच्या विकासासाठी कार्यरत आहे. या प्रकल्पाचा उद्देश जलसंपत्तीच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करणे आणि मत्स्यपालन क्षेत्राच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणे हा आहे. जलसंपत्तीचा योग्य वापर करून जलाच्या बचतीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. यामुळे जलवापराच्या क्षेत्रात सुधारणा होऊन जल संरक्षण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर मत्स्यपालन क्षेत्राचा विकास करणे, जलजीवांचे संरक्षण करणे आणि ते वाढवणे व शेतकऱ्यांना आणि मत्स्यपालकांना जलस्रोतांचा शाश्वत आणि प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन दिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यपालनातील उत्पादनक्षमतेत वाढ केली जाते, ज्यामुळे स्थानिक पातळीवर स्मार्ट फिश फार्मिंग च्या माध्यमातून रोजगार निर्माण होतो आणि लोकांची आर्थिक स्थिती सुधरते. जल आणि मत्स्यपालनाबाबत जनजागृती करणारे विविध शिबिरे, कार्यशाळा आणि शैक्षणिक कार्यक्रम या केंद्रमार्फत आयोजित केले जातात.

जलक्रांती मत्स्यालय प्रकल्प महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कार्यरत आहे आणि यामुळे लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणली जाते आहे. बाहेर देशातील तंत्रज्ञानाचा आपल्या देशातील शेतकरी व भूमिहीन लोकांना उपयोग व्हावा, आपल्या देशातही जलक्रांती फिशरीच्या माध्यमातून लोकांचा आर्थिक स्तर विकसित व्हावा. योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपणही मत्स्य पालन करून आपल्या शेतकऱ्यांची प्रगती करू शकतो असे मत या केंद्राचे संचालक मा. श्री. सद्दाम मकानदार आणि मा. श्री. प्रशांत चौगुले यांनी व्यक्त केले. या अभ्यास भेटीदरम्यान सत्तार विद्यार्थिनींनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या प्रसंगी कन्या महाविद्यालय मिरज चे प्रा. डॉ. जयकुमार चंदनशिवे, प्रा. डॉ. विनायक पवार, अभ्यास भेटीचे नियोजन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. गंगाधर चव्हाण व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. शबाना हळंगळी यांनी केले. या प्रसंगी जलक्रांती फिशरीज मिरज चा सर्व स्टाफ उपस्थित होता.

Thursday, January 30, 2025

डॉ. गंगाधर चव्हाण लिखित "व्यक्तिमत्व विकास" पुस्तकाचे प्रकाशन

































































‘व्यक्तिमत्त्व विकास’ या पुस्तकाचे मा. विनायकराव गोखले यांच्या हस्ते प्रकाशन


 मिरज: दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटी मिरज या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विनायकराव गोखले यांच्या हस्ते प्रा. डॉ. गंगाधर चव्हाण व प्रा. डॉ. विश्वनाथ सूर्यवंशी लिखित ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन कन्या महाविद्यालय मिरज येथे नुकत्याच झालेल्या “लिंगभेद संवेदनशीलतेसाठी लिंगभेद समानता” या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या पुस्तकात लेखकाने व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या गुढतेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यात व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अर्थ, व्याख्या, गुणधर्म, उपाय, महत्त्व, प्रकार, व्याप्ती, फायदे, तसेच व्यक्तिमत्त्व विकासाची वैशिष्ठे आणि सिद्धांत याबद्द्ल सखोल माहिती दिली आहे. यातून विद्यार्थ्यांनी व समाजातील सुजाण नागरिकांनी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण विकास कसा करावा याबद्दल यथोचित माहिती मिळते. या पुस्तकाद्वारे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात आवश्यक बदल कसे घडवावेत हे समजून घेण्यास मदत होते. म्हणून हे पुस्तक आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. असे प्रतिपादन मा. श्री. विनायकराव गोखले यांनी केले या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा. श्री. राजू झाडबुके, अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. उल्हास माळकर,  कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सुनीता माळी, हे उपस्थित होते. सूत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सागर पाटील यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ. गंगाधर चव्हाण यांनी तर संयोजन प्रा.विनायक वनमोरे व प्रा. डॉ. शबाना हळंगळी यांनी केले. अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात समाजाच्या ज्या लिखाणाच्या व  वैचारिक अपेक्षा असतात त्या अपेक्षा शिक्षक व प्राध्यापकांनी पूर्ण करायच्या असतात. प्राध्यापकांनी अजून नवीन साहित्याची निर्मिती केली पाहिजे व आपला समाज सक्षम करण्यासाठी धरपड केली पाहिजे. आपले साहित्य हे समाज घडविण्याचे काम करत असतात त्यासाठी हे साहित्य समाजात तळागाळापर्यंत घेऊन जाणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘व्यक्तिमत्त्व विकास’ हे पुस्तक शिक्षक होणाऱ्या भावी पिढ्यांसाठी व विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आहे  याचा सर्व विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आभार कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षिका प्रा. सौ. नलिनी प्रज्ञासूर्य यांनी  मानले. तसेच या कार्यक्रमास संशोधक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व  विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

राष्ट्रीय गृहिणी दिवस विशेष लेख : लक्ष्मी यादव

 "घरात तर असतेस, काय काम असतं तुला?" या डायलॉगने भारतातील अनेक घरांची सकाळ होत असते. " मी गृहिणी आहे, काही काम करत नाही. घरात...