KANYA MAHAVIDYALAYA MIRAJ
Department of Sociology
Monday, May 5, 2025
Thursday, March 27, 2025
कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची जलक्रांती फिशरीजला भेट
कन्या महाविद्यालयात मिरज येथील विद्यार्थिनींची जलक्रांती फिशरीज ला अभ्यास भेट
कन्या महाविद्यालयात मिरज येथील समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी जलक्रांती फिशरीज मिरजच्या मत्स्य उत्पादन व संवर्धन केंद्राला नुकतीच भेट दिली. या अभ्यास भेटीतून त्यांनी विविधगोष्टी समजून घेतल्या त्यात जलक्रांती मत्स्यालय हा एक महत्वाचा प्रकल्प आहे, जो महाराष्ट्र राज्यातील जलसंपदांचा शाश्वत वापर आणि मत्स्यपालनाच्या विकासासाठी कार्यरत आहे. या प्रकल्पाचा उद्देश जलसंपत्तीच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करणे आणि मत्स्यपालन क्षेत्राच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणे हा आहे. जलसंपत्तीचा योग्य वापर करून जलाच्या बचतीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. यामुळे जलवापराच्या क्षेत्रात सुधारणा होऊन जल संरक्षण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर मत्स्यपालन क्षेत्राचा विकास करणे, जलजीवांचे संरक्षण करणे आणि ते वाढवणे व शेतकऱ्यांना आणि मत्स्यपालकांना जलस्रोतांचा शाश्वत आणि प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन दिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यपालनातील उत्पादनक्षमतेत वाढ केली जाते, ज्यामुळे स्थानिक पातळीवर स्मार्ट फिश फार्मिंग च्या माध्यमातून रोजगार निर्माण होतो आणि लोकांची आर्थिक स्थिती सुधरते. जल आणि मत्स्यपालनाबाबत जनजागृती करणारे विविध शिबिरे, कार्यशाळा आणि शैक्षणिक कार्यक्रम या केंद्रमार्फत आयोजित केले जातात.
जलक्रांती मत्स्यालय प्रकल्प महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कार्यरत आहे आणि यामुळे लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणली जाते आहे. बाहेर देशातील तंत्रज्ञानाचा आपल्या देशातील शेतकरी व भूमिहीन लोकांना उपयोग व्हावा, आपल्या देशातही जलक्रांती फिशरीच्या माध्यमातून लोकांचा आर्थिक स्तर विकसित व्हावा. योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपणही मत्स्य पालन करून आपल्या शेतकऱ्यांची प्रगती करू शकतो असे मत या केंद्राचे संचालक मा. श्री. सद्दाम मकानदार आणि मा. श्री. प्रशांत चौगुले यांनी व्यक्त केले. या अभ्यास भेटीदरम्यान सत्तार विद्यार्थिनींनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या प्रसंगी कन्या महाविद्यालय मिरज चे प्रा. डॉ. जयकुमार चंदनशिवे, प्रा. डॉ. विनायक पवार, अभ्यास भेटीचे नियोजन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. गंगाधर चव्हाण व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. शबाना हळंगळी यांनी केले. या प्रसंगी जलक्रांती फिशरीज मिरज चा सर्व स्टाफ उपस्थित होता.
Thursday, January 30, 2025
डॉ. गंगाधर चव्हाण लिखित "व्यक्तिमत्व विकास" पुस्तकाचे प्रकाशन
‘व्यक्तिमत्त्व विकास’ या पुस्तकाचे मा. विनायकराव गोखले यांच्या हस्ते प्रकाशन
मिरज: दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटी मिरज या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विनायकराव गोखले यांच्या हस्ते प्रा. डॉ. गंगाधर चव्हाण व प्रा. डॉ. विश्वनाथ सूर्यवंशी लिखित ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन कन्या महाविद्यालय मिरज येथे नुकत्याच झालेल्या “लिंगभेद संवेदनशीलतेसाठी लिंगभेद समानता” या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या पुस्तकात लेखकाने व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या गुढतेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यात व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अर्थ, व्याख्या, गुणधर्म, उपाय, महत्त्व, प्रकार, व्याप्ती, फायदे, तसेच व्यक्तिमत्त्व विकासाची वैशिष्ठे आणि सिद्धांत याबद्द्ल सखोल माहिती दिली आहे. यातून विद्यार्थ्यांनी व समाजातील सुजाण नागरिकांनी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण विकास कसा करावा याबद्दल यथोचित माहिती मिळते. या पुस्तकाद्वारे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात आवश्यक बदल कसे घडवावेत हे समजून घेण्यास मदत होते. म्हणून हे पुस्तक आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. असे प्रतिपादन मा. श्री. विनायकराव गोखले यांनी केले या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा. श्री. राजू झाडबुके, अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सुनीता माळी, हे उपस्थित होते. सूत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सागर पाटील यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ. गंगाधर चव्हाण यांनी तर संयोजन प्रा.विनायक वनमोरे व प्रा. डॉ. शबाना हळंगळी यांनी केले. अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात समाजाच्या ज्या लिखाणाच्या व वैचारिक अपेक्षा असतात त्या अपेक्षा शिक्षक व प्राध्यापकांनी पूर्ण करायच्या असतात. प्राध्यापकांनी अजून नवीन साहित्याची निर्मिती केली पाहिजे व आपला समाज सक्षम करण्यासाठी धरपड केली पाहिजे. आपले साहित्य हे समाज घडविण्याचे काम करत असतात त्यासाठी हे साहित्य समाजात तळागाळापर्यंत घेऊन जाणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘व्यक्तिमत्त्व विकास’ हे पुस्तक शिक्षक होणाऱ्या भावी पिढ्यांसाठी व विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आहे याचा सर्व विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आभार कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षिका प्रा. सौ. नलिनी प्रज्ञासूर्य यांनी मानले. तसेच या कार्यक्रमास संशोधक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
-
‘व्यक्तिमत्त्व विकास’ या पुस्तकाचे मा. विनायकराव गोखले यांच्या हस्ते प्रकाशन मिरज: दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटी मिरज या संस्थेचे अध्यक्ष ...